Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

Nov 27, 2019

जातीयवाद

जातीयवादाचा आरोप आपल्याला घप्प चिकटेल इतके जातीयवादी वर्तन आपण स्वतः न करणे याला तारतम्य पाळणे, असे म्हणतात.

- गंगाधर मुटे

Nov 25, 2019

अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन

चौदावे अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन, यवतमाळ येथे मी सादर केलेली गझल.
------------
लाख रोधके वाट रोखती, पाय थबकले नाही
मी शस्त्र बदलले आहे, लक्ष्य बदलले नाही
------------
कोण जाणे खेळ नियतीचा, की तुझेच नशीब फुटेल
नकोस करू अन्याय इतका, कुणी बंड करून उठेल
------------
वैश्विक खाज नाही

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही

स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही

© गंगाधर मुटे ’अभय’
-------------

Nov 15, 2019

शेती आणि सरकार

जर पंधरवड्यापूर्वी सरकार स्थापन झालं असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कवले चढली असती का?
किंवा उद्या सरकार स्थापन झालं की लगोलग शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या जाणार आहे का?

आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात शेती करताना एखाद्याला सरकारची किती कोटी रुपयांची मदत झाली हे कुणीतरी मला जरा सांगाल का?

जर शेतकऱ्यांना सरकारकडून काहीच मिळत नसेल तर निष्कारण अशा परिस्थितीचा संबंध शेतीशी जोडून जणू काही सरकार असलं की शेतकऱ्याला भरमसाठ मदत केली जाते असा चुकीचा संदेश बिगरशेतकरी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम होत असते…

आणि
नको त्या बाबीचा शेतीशी संबंध जोडणे म्हणजे अनावश्यक रित्या शेती बद्दलचे प्रेम उचंबळून आणण्यासारखे आहे.

नको तिथे शेती विषय घालून सोंगाड्या सारखी नाटके करण्याची गरज आहे मला वाटतं नाही.
****
शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते फार तर असे म्हणू शकतात की सरकार नसल्यामुळे आमची सरकार विरोधी लढाई थांबली आहे.
शेतकऱ्याला काहीच मिळणार नसेल तरी सुद्धा आमची लढाई सरकारच्या विरोधात रात्रंदिवस सुरू असते.
सरकार नसल्यामुळे आमच्या लढाईमध्ये खंड पडला आहे. त्यामुळे आमचे लढाईसाठी हात शिवशिवत आहे.
अशा स्थितीत तातडीने सरकारची स्थापना करावी आणि आमच्या लढाईच्या रस्ता मोकळा करून द्यावा.
त्यामुळे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते किती लढवैय्ये, किती लढाई बहाद्दर आहेत आणि शेतकरी व शेतकऱ्यांची बाजू रात्रंदिवस कशी लावून धरत असतात, इतके तरी बिगर शेतकरी समाजाच्या लक्षात येईल.

- गंगाधर मुटे आर्वीकर

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं