हक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥
या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||
लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१||
विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२||
शेतकर्यांच्या,कामकर्यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३||
- गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
चौदा/आठ/दोन हजार दहा
#शेतकरी-गीत #अभय #गंगाधर-मुटे #माझी-वाङ्मयशेती
शेतकरी गर्जन गीत
शेतकरी कधी गरजत नाही आणि बरसतही नाही. संबंध शेतीचा इतिहास जरी चाळून बघितला तर १९८० नंतरचा काही काळ सोडला तर शेतकरी गरजताना आढळल्याच्या पाऊलखुणा इतिहासातही आढळत नाहीत.
शेतकरी देशाचा मालक पण निव्वळ नामधारी. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या वाट्याला निव्वळ हलाखीचे आणि लाचारीचे जिणे वाट्यास येत असल्याच्या नियमिततेने इतिहास भरून पावला आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत "गोरे जाऊन काळे इंग्रज आले" पण शेतीच्या बांधावर स्वातंत्र्याचा सूर्य कधी पोचलाच नाही.
का पोचला नाही? शेतकरी स्वातंत्र्याचा हकदार नाही का? असेल तर.....
या देशाचे पालक आम्ही सच्चे कास्तकार रे
लाल किल्याच्या सिंहासनाचे आम्ही बी हकदार रे
अशी डरकाळी शेतकरी का फोडत नसतील?
स्वातंत्र्यदिनाच्या मंगल पर्वावर सादर आहे.... एक शेतकरी गर्जन गीत.
आपण ऐका आणि इतरांना ऐकवा....
=÷=÷=÷=÷=
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.