Powered by Blogger.
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......

May 22, 2010

शेती चर्चा - भाग १

शेती चर्चा - भाग १.


मायबोली या संकेतस्थळावर मी लिहिलेल्या "हा देश कृषीप्रधान कसा?" या लेखावरील चर्चेचे काही अंश.




ईन्टरफेल | 10 May, 2010 - 09:56
कुनि निंदा कुनि वंदा शेति हाच आमचा धंदा! तुम्हांला काय वाटते ? आम्हि शेतकरि लोक वेडे आहोत का ? आहो...आमच्याकडे दोन दोन एकर शेति आसनारे मोटारसायकल घेउन फिरतात! मला चांगल आठवत..१९९५ सालि आमच्या गावात एकच ग्रामपंचायतिचा टिव्हि होता आज घडिला रोजंदारिवर काम करनार्‍याच्या घरि डिश आनि कलर टिव्हि आहे ब्लॅकव्हाईट टिव्हि आनि दुरदर्शनचि अ‍ॅटेना बघायला देखिल मिळ्नार नाहि ! १० लाख शेतकर्‍यां मागे एखाद्याने आत्महात्या केलि आसेल तर आख्खा शेतकरि वर्ग कर्जात आहे आसे म्हनायचे आहे काय ? मि स्वता: एक हाडाचा शेतकरि आहे मि माझ्या मातित सुखात आहे .आता माझि शेति सोडुन तुमच्या शहरात काम करायला आलोच तर... मि दाहावि नापास! मला कोन काम देईल ? समझा दिलहि तरि .......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व मिळेल का? आहे उत्तर कुनाकडे? त्यापेक्षा मि माझ्या शेतित गावात सुखात आहे! आनि नेटवर बसुन आपल्या सारख्या विद्वान मंडळिंच्या चर्चेत सहभागहि घेत आहे ! बाकि तुमच चालु ध्या ..दळत बसायला काय हारकत आहे?.आपल्या ईतके आंम्हि हुशार नाहि आनि आमचे ईतके वाचन हि नाहि.......कार्ट बावळटहे घ्या पदरात ...................बाकि आंम्हि हिकड खाउन पिउ,,,,,,,,न सुखि आहोत.. ;) .आंमळ काळजि नसावि........ ;) ..एक शेति ऊपयोगि माणुस न मिळाल्या मुळे शेति करित नसलेला शेतकरि............


गंगाधर मुटे | 10 May, 2010 - 22:41
१० लाख शेतकर्‍यां मागे एखाद्याने आत्महात्या केलि आसेल तर आख्खा शेतकरि वर्ग कर्जात आहे आसे म्हनायचे आहे काय ?
दुर्दैवाने अख्खा शेतकरी वर्ग कर्जात आहे, हे खरे आहे.


आणि महत्वाची गोष्ट अशी की आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यापेक्षा, आत्महत्त्या न करणार्‍या शेतकर्‍यावरील कर्जाचा आकडा मोठा आहे.


त्यापेक्षा मि माझ्या शेतित गावात सुखात आहे!


.......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व नोकरी करूनच किंवा उद्योग करूनच मिळू शकतात. शेती करून नाही हे तुम्ही एका अर्थाने मान्य करता आहात.


.......एसी ......कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व न मिळताच तुम्ही सुखी आहात हे तुमच्या "सुखाच्या" व्याख्येवर अवलंबून आहे.


ईन्टरफेल | 11 May, 2010 - 17:47


होय >>> आत्महत्त्या करणार्‍या शेतकर्‍यापेक्षा, आत्महत्त्या न करणार्‍या शेतकर्‍यावरील कर्जाचा आकडा मोठा आहे.तुमच म्हनन खरहि आसेल , जर आख्खा शेतकरी वर्ग कर्जाखालि आसेल,तर त्याला जे कर्जबाजारी शेतकरी आहेत तेच जबाबदार आहेत,कर्जाचा डोंगर काहि एका वर्षात होत नाहि,ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल तोहि आज २० ते २५ ह्जाराचे{हा आकडा ऊदाहरनादाखल आहे ह्या पेक्षा कितितरी पटिने जादा आसु शकतो} कर्ज कढतो मग! ते फेडायचे कसे? त्यात ह्या राजकिय पक्षांचा थयथयाट , आंम्हि विज बिल माफ करनार ,शेतिवरिल कर्ज माफ करनार, त्यामुळे हा जो कर्जाखालिल वर्ग आहे तो कर्जच भरत नाहि, त्यामुळे शेतीच्या मुळ किमती पेक्षा कर्ज जादा होते, परिनामि कर्ज वाढत जाते , मग बँकेच्या नोटिसा, कोर्टाच्या नोटिसा, त्याचे परिनाम आपल्या समोर आहेच! ...........आमच्या बाबतित बोलायच झाल्यास, आंम्हि वेळेवर कर्ज भरतो, अन..नाहि भरायला जमले तर व्याज भरुन रीनिव्ह करुन घेतो,आनि...>कॅबिन ..खुर्चि संगनक हे सर्व न मिळताच तुम्ही सुखी आहात हे तुमच्या "सुखाच्या" व्याख्येवर अवलंबून आहे. >>> आहो हे सर्व आमच्याकडे आहे ! स्व:ताचे आहे, आणि हे वर लिहिलेले आहे. त्यावर बसुन तर आंम्हि नसलेल्या आकलेचे तारे तोडतोय! आनि हो आंम्हि खरोखर दहावि नापास आहोत मला दहाविला सर्व विशयात ८८ मार्क होते! आपल्या ईतके आंम्हि हुशार नाही! आनी आमचे ईतके वाचन हि नाही.....कार्ट बावळटहे घ्या पदरात ................ ;) ! ..एक शेती ऊपयोगी माणुस न मिळाल्या मुळे शेती करीत नसलेला शेतकरी............


गंगाधर मुटे | 11 May, 2010 - 18:47


ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल तोहि आज २० ते २५ ह्जाराचे{हा आकडा ऊदाहरनादाखल आहे ह्या पेक्षा कितितरी पटिने जादा आसु शकतो} कर्ज कढतो मग!
ईन्टरफेल, तुम्ही अगदी या देशातल्या थोर विचारवंतासारखेच विचार करताय. कारण तुमच्या वरील एका वाक्यातच या देशातल्या शेतीची हलाखी स्पष्ट होत असतांना तुम्ही मात्र ते मानायला तयार नाहीत.हाच गुण नेमका विचारवंतामध्ये आणि तज्ज्ञामध्ये आढळत असतो.


आता हे बघा.


१) शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल
दहा हजार वार्षिक उत्पन्न म्हणजेच एका अख्ख्या शेतकरी कुटूंबाचं उत्पन्न.
एवढ्या उत्पन्नात शेतीसाठी होणारा खर्च किती? त्याला जगायला उरतात किती? एवढ्या उत्पन्नात कसे जगावे? या विषयी जरा सविस्तर लिहाना.


२) आणि मग तो कर्ज काढून जगत असेल तर तो दोष कसा?
त्याने कंदमुळे, पालापाचोळा, दगड धोंडे खावून जगावे काय?
की त्याने आणि त्याच्या कुटूंबियाने पैसे नसेल तर कपडेही घालू नये? कपडे घातले नाही तरी चालेल पण कर्ज काढू नये, असे तुम्हाला वाटते?


३) अजिबात कपडे न घालणारेही स्वतःला सुखी समजतातच की.


४) ज्याच्या शेतीत दहा,हजाराच ऊत्पंन्न मिळनार आसेल त्यालाहि २० ते २५ ह्जाराचे कर्ज मिळत असेल तर या देशातल्या बँका बेअक्कल/ अव्यावहारी आहे हे सिद्ध होते.


त्यांचा दोष शेतकर्‍याच्या माथ्यावर का मढता?


अनिल७६ | 12 May, 2010 - 12:31


मुटेजी , तुमचे सगळे मुद्दे नेहमी अस्सल असतात !


हे सगळं कोठुन आल ?


गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 14:32


<< मुटेजी , तुमचे सगळे मुद्दे नेहमी अस्सल असतात !
हे सगळं कोठुन आल ? >>



अनिलजी, हे सर्व आपल्या अवतीभवतीच असते.


त्यासाठी विद्द्याविभुषणांची गरजच नाही.
फक्त एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण मानवीय असावा.


अनिल७६ | 12 May, 2010 - 15:48


मुटेजी, ....(तोच प्रतिसाद (बदलुन) पण योग्य जागी टाकतोय ...)


या कृषीप्रधान देशात एखाद्या शेतकर्यांसाठी लढणारयां नेत्यांच्या सभेची,संघर्षाची,आंदोलनाची,उपोषणाची बातमी,त्यात पोटतिडकीने मांडलेले अनेक ज्वलंत आणि त्याच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले मुद्दे,झालेली चर्चा यांना आपल्या देशात वर्तमानपत्रात खरच किती आणि कुठे जागा असते ? त्यापेक्षा एखाद्या शेतीवर उभ्या आयूष्यात चकार शब्द न काढलेल्या पुढारयाच्या "वाढदिवसाची " सचित्र बातमी पहिल्या पानावर झळकते...


गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 16:34


अनिलजी,
शेतकरी काय किंवा शेतकरी नेता काय.... यांची दखल घ्यावी असे यांच्याकडे काय आहे?
हे सगळे फुकट वर्तमानपत्र वाचतात, विकत घेवून वाचत नाही असे त्यांना वाटते.
वर्तमानपत्र विकत घेवून वाचणारे आणि जाहीरात देणारे त्यांच्यासाठी महत्वाचे.


आणि तरीही हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ बरका....!!


गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 16:44


<< माझ्या मते, उगाच सरकार किंवा शेतकरी यांना दोष देण्या पेक्षा, भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यावर चर्चा झाली तर ते उत्तम राहील....>>
गणेशजी,
चर्चा कोणी करायची? तुम्ही आणी मी.
कशासाठी? तर भारताला कृषीप्रधान देश कसा बनविता येइल यासाठी.
तुम्ही आणि मी चर्चा केल्याने भारत कृषीप्रधान देश बनेल?
भारताला कृषीप्रधान देश बनविण्याची ताकद आणि 'अधिकार' माझ्याकडे नाहीत.
तुमच्याकडे आहेत? जर नसेल तर... चर्चेचा उपयोग?
ज्याच्याकडे ताकद आणि 'अधिकार' आहे त्या सरकारला सोडून देवून ...
निव्वळ वांझोटी चर्चा करण्याचे प्रयोजनच काय?

अनिल७६ | 12 May, 2010 - 16:59

मुटे जी, खरं आहे !

वर्तमानपत्र विकत घेवून वाचणारे आणि जाहीरात देणारे त्यांच्यासाठी महत्वाचे.
आणि तरीही हे लोकशाहीचे चवथे आधारस्तंभ बरका....!!
आजकाल तर या "स्तंभाला" पेड न्युज चा "आधार" ज्यास्त मिळु लागलाय ....!

अनिल७६ | 12 May, 2010 - 17:13


मुटेजी, तुमच्या मते ..
भारत खरंच कृषीप्रधान होण्यासाठी ,शेतीला दिवस चांगले येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील ?
ज्याच्याकडे ताकद आणि 'अधिकार' आहे त्या सरकारला
मला तर वाटतं यासाठी शेतकरयांची स्वतंत्र "वोट बैंक" निर्माण झाली पाहिजे,अधिकाधिक लोक त्यातुन निवडुन गेले पाहिजेत ...

गंगाधर मुटे | 12 May, 2010 - 17:14


<< भारत खरंच कृषीप्रधान होण्यासाठी ,शेतीला दिवस चांगले येण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील ?>>
सर्वप्रथम " शेती फायद्याची होईल अशी व्यवस्था व्हायला पाहीजे"
त्यानंतर बाकी सर्व.

(मायबोलीवरून साभार)                       (क्रमश:)
...................................................................................

May 15, 2010

शेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ

शेतीमालाचा उत्पादन खर्च आणि बोलघेवडे तज्ज्ञ

                            हे खरे आहे की संपुर्ण भारतवर्षातील शेती तोट्याची हे माझे ठाम मत आहे. पण मला वाटते तेच सर्व खरे आणि बाकी सर्व चुक असे मी मानत नाही. कारण ज्या अंगाने मी शेतीचा विचार केला त्या अंगाने शेती तोट्याची दिसत असेल पण कोणत्याही विषयाला अनेक अंगे असतात, बाजु असतात. कदाचित वेगळ्या अंगाने विचार केल्यास माझी मते चुकीची ठरु शकतात. म्हणुन शेती या विषयाची सांगोपांग चर्चा व्हावी असे मला वाटते.
                 मग शेती फ़ायद्याची की तोट्याची हे कशाच्या आधारे ठरवायचे? येथे बोलघेवडे पांडित्य उपयोगाचे नाही. लेखन कौशल्य तर अजिबात उपयोगाचे नाही.
येथे कागद आणि पेनच उपयोगाचा.
                पिकाचा उत्पादनखर्च आणि त्याला मिळणारे बाजारभाव किंवा शासकिय आधारभुत किमती यांच्या तुलनात्मक आकड्यावरूनच शेती "फ़ायद्याची की तोट्याची" हे ठरू शकते.
आणि सर्व राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ या विषयावर अजिबातच तोंड उघडायला तयार नाही.
                एखाद्या उद्योग उत्पादनाचा उत्पादनखर्च काढणे फारच सोपे आहे,कुणालाही काढता येईल कारण त्याची मार्गदर्शक तत्वे, नमुने ठरलेली आहेत.
                पण शेतमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा ? हे काम एखाद्या सीएला सुद्धा सहज जमायचे नाही कारण त्याची मार्गदर्शक तत्वे,नमुने ठरलेली नाहीत. एखाद्या सीएने काढला तरी तो निर्दोष असणार नाही.
               एकाअर्थाने शेतीविषयक सांगोपांग चर्चा करणे, शेतमालाचा उत्पादनखर्च काढायचा प्रयत्न करने ही ऐतिहासिक गोष्ट आहे कारण हे आजवर फारसे घडलेले नाही.
कृषी विद्यापिठांत एखाद्या पिकाचा उत्पादन खर्च काय येतो हे शास्त्रियरित्या का शिकवत नाहीत?
कृषी विद्यापिठांत सगळेच विषय असतात पण नेमका शेतमालाचा उत्पादन खर्च कसा काढावा हाच विषय का नसतो?
कृषी विद्यापीठे, राजकारणी, शेतकीतज्ज्ञ, मान्यवर अर्थतज्ज्ञ, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत ही मंडळी निव्वळ शेतकयांना फ़ुकटचे सल्ले देऊन नुसती मुक्ताफळे उधळण्याऐवजी प्रयोग शेती का सुरु करित नाहीत. कृषी विद्यापिठांकडे हजारो एकर जमिन आहे. तेथे ते किति खर्चात किती उत्पन्न घेतात हे जाहीर का करित नाही?

             याउप्परही, लोकांना जर हे श्रमकारण व अर्थकारण समजत नसेल, तर या निर्णयप्रक्रियेत भुमिका बजावणार्‍या व्यक्तिंना, व बाष्कळ बडबड करणार्‍यांना काही काळापर्यंत एखादे शेत पिकवुन, त्या उत्पन्नाच्या बळावर तिथे जगुन दाखवायला ठेवले पाहिजे.

             कृषी विद्यापीठांना हजारो एकर जमिन देवुन त्या शेतीत किमान पाच वर्ष उत्पन्न घेवुन त्या उत्पन्नावर कुलगुरुसहीत सर्वांना आपला उदरनिर्वाह करण्यांस सांगावे. शासकिय अनुदान बंद करावे. वर्षाशेवटी काय शिल्लक राहाते ते शेतकर्‍याला स्वानुभवाने दाखवावे.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात असे किमान एखादे क्रियाशील  विद्यापीठ असणे अत्यंत आवश्यक आहे.

गंगाधर मुटे
.............
नमुन्यादाखाल काही पिकांचे उत्पादन खर्च.
१) जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.
२) बागायती कापसाचा उत्पादन खर्च

May 12, 2010

विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो?

विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो?

                 विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न "मायबोली" या संकेतस्थळावर शेतीविषयक चर्चेदरम्यान अनेकदा उपस्थित झाला पण या विषयाला मी चर्चेत टाळायचा प्रयत्न केला कारण याविषयी जे माझे मत आहे ते अनेकांच्या मनाला दुखावणारे ठरु शकते याची मला जाणिव आहे. म्हणुन असे मुद्दे थोडे बाजुला सारने हिताचे असते. मी सौम्य भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो, तरीपण भावना दुखावल्यास माफी असावी.
                विदर्भातलाच शेतकरी आत्महत्या का करतो? हा प्रश्न विचारण्यामागे मला दोन तर्‍हेचे जनमानस आढळते.
त्यामुळे एकाच प्रश्नाचे दोन उत्तरे संभवतात.
१) पहिला प्रश्नकर्ता अभ्यासु आणी जिज्ञासु असतो. त्याचा प्रश्नही प्रामाणिक असतो. परिस्थिती जाणुन घ्यायची इच्छा असते.
२) दुसरा प्रश्नकर्ता खोचक आणि कुत्सित असतो. त्याच्या नजरेत विदर्भातील शेतकरी मागास असतो.
                       मला असे वाटते कि संपुर्ण देशातील शेतकर्‍यांची परिस्थीती जवळ-जवळ सारखीच आहे.त्यांचे दु:ख,वेदना आणि समस्याही सारख्याच आहेत. फरक असलाच तर "काही शेतकरी सुपात तर काही जात्यात" एवढाच आहे. आज जे सुपात आहेत ते उद्या जात्यात येणारच. म्हणुन कधी शेतकरी आंदोलने युपी मध्ये होतात तर कधी प.बंगालमध्ये, कधी हरयाना- पंजाबमध्ये आंदोलने होतात तर कधी महाराष्ट्रामध्ये.
                      तसेच पिकातील विविधतेमुळे कधि कापसाचे भाव पडतात तर कधि कांद्याचे, कधि गव्हाचे भाव पडतात तर कधि सोयाबीनचे.
                     तसेच अवर्षणाबाबत. देशात कधि पुर्व भागात दुष्काळ पडतो तर कधि उत्तरेत, कधि दक्षिणेत तर कधि पश्चिमेत.
                    महापुराचे बाबतीतही तेच, जास्त पावसाचे बाबतीत तेच, कमी पावसाचे बाबतीत तेच. आणी अकाली पावसाने होणार्‍या नुकसानीबाबतही तेच.

                   शेती ही मुख्यत: निसर्गावर अवलंबुन असल्याने देशात एकाचवेळी सर्व शेतकर्‍यांवर समान संकट कोसळत नाही, आळीपाळीने संकटे कोसळत राहातात.
                  संपुर्ण देशात एकच पिक घेतले जात नाही, विविध पिके घेतली जातात त्यामुळे शेतमालाच्या कोसळलेल्या भावाचा फटका त्या-त्या विभागातील शेतकर्‍यांना बसत असतो.
                  निसर्गात विविधता म्हणुन शेतकर्‍यांच्या संकटात विविधता म्हणुन आत्महत्याग्रस्त प्रदेशात विविधता.
                 शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आज विदर्भात जास्त आहे कारण सततच्या दुष्काळामुळे नापिकी, मध्यंतरीच्या काळात शेतमालाचे विशेषतः कापसाचे पडलेले भाव हेच प्रमुख कारण आहे. बाकी सर्व कारणे ही दुय्यम कारणे आहेत.
शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण विदर्भात जास्त आहे याचा अर्थ उर्वरीत देशातला शेतकरी फारच सुखी आहे असा अजिबात होत नाही, आणि विदर्भातील अडाणी,आळसी व बाकीचे शहाणे,कर्तव्यप्रवीण असा अर्थ तर अजिबात होत नाही.
               असा अर्थ काढायचा पुढार्‍यांचा उद्योग आहे. "तोडा,फोडा आणि राज्य करा" ही विलायती कुट्निती आमच्या राज्यकर्त्यांनी इंग्रजांकडुन चांगल्यातर्‍हेने हस्तगत केली आहे. ती पुढार्‍यांची     जीवनशैली बनली आहे. हे जिथे जिथे जातात तिथे तिथे तुकडे पाडायचेच उद्योग करतात. हे फुट पाडण्यात एवढे उस्ताद की स्वतःवर लगाम लावण्यासाठी स्वतःसाठी, स्वतःच पक्षांतर बंदिचा कायदा करावा लागला.
                या देशातल्या शेतकर्‍यांचे आधीच खुप तुकडे करुन झालेत. उदा- लहान शेतकरी, मध्यम शेतकरी, मोठा शेतकरी, कोरडवाहु शेतकरी, बागायतदार शेतकरी, कापुस शेतकरी, सोयाबिन शेतकरी, उस शेतकरी, संत्रा शेतकरी, आदिवासी शेतकरी, कुनबी शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी,.......... आणखी किती तुकडे करणार?
                याउपरही कुणास विदर्भापेक्षा मराठवाडा किंवा पच्छिम महाराष्ट्र किंवा बारामतीचा शेतकरी सुखी आहे असे वाटत असेल तर त्यांनी मागच्या सार्वत्रिक कर्जमाफीची आकडेवारी बघावी त्यावरुन त्यांना स्वच्छ / स्पष्ठ पुरावा मिळेल की कोणत्या विभागातील शेतकरी जास्त कर्जबाजारी होते याचा. आणि कुणाच्या बुडाखाली कीती अंधार आहे याचाही.
              पुढारी म्हणतात त्याप्रमाणे जर पश्चिम महाराष्ट्रात आनंदी-आनंद असता तर युपी-बिहारचे लोंढे मुंबई ऐवजी बारामती किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे नसते का धावले?

...गंगाधर मुटे

May 10, 2010

आत्महत्त्येसाठी प्रलोभन?

आत्महत्त्येसाठी प्रलोभन?

                    सध्या शेतकरी उपेक्षेचा विषय झाला आहे. त्यातल्या त्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी तर कुचेष्टेचा.  त्याच्याबद्दल आत्मियता कमी आणि सल्लेयुक्त उपहासच जास्त.बाकी जावू द्या पण दस्तुरखुद विदर्भातच स्थानिक पुढारी,विद्वान,तत्ववेत्ते हा प्रश्न गंभीरतेने घेतांना दिसत नाही.विदर्भातच शेतकरी आत्महत्त्या जास्त का होतात याचे कारण स्थानिक पुढारी,विद्वान,तत्ववेत्ते आणि लाचखोर प्रशासन यांची उदासीनता हे एक असू शकते. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देण्यापुरतच याचं शेतकरी प्रेम असतं. आजकाल तर तेही बदललं,शासकीय निकषामध्ये नव्वद टक्के प्रकरणे अपात्रच ठरविली जातात.

                          आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देणे हा सुद्धा माझ्या मते वादाचा विषय आहे. संकटाशी सामना करून होतकरूंनी जिद्दीने जगायचं म्हटलं तर पावलोपावली लाच मागणारी,लाचलुचपत दिल्याशिवाय काम न करणारी मंडळी भेटतात.खिशात पैसा नसेल तर कामच होत नाही.जगायची इच्छा असणारांचे हे हाल पण आत्महत्त्या केली तर एक लाख,हा का न्याय झाला?. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला एक लाखाची मदत देणे म्हणजे आत्महत्त्येसाठी प्रलोभन देण्यासारखं नाही का? कि लाखाचं आमिष दाखवून आम्हीच त्याला आत्महत्तेस प्रवृत्त करीत आहोत?

शेतीविषयक धोरणे का फ़सतात?

                    शेतीमध्ये  उत्पादन घेण्यायोग्य अनेक पिके आहेत, अगदी फुलझाडापासुन ते फळझाडापर्यन्त,कड धान्यापासुन ते त्रुणधान्यापर्यन्त,स्ट्रॉबेरी पासुन जेट्रोपा पर्यन्त,निलगिरिपासुन ते सागवानापर्यन्त, एवढंच नाहीतर तंबाखुपासुन ते अफिम-गांज्यापर्यन्त. घेण्यायोग्य पिके खुप आहेत्,कोणतेही पीक कुठेही कृत्रिम वातारणनिर्मीती करुन किंवा हरितगृहाच्या सहाय्याने घेता येणे शक्य आहे. प्रश्न जमिनिच्या दर्जाचाही नाही, शेणखत किंवा कंपोस्ट खताचा भरपुर वापर केल्यास नापिक जमिनितही भरघोस उत्पन्न मिळु शकतं. अडचण कौशल्याचिही नाही,ते शेतक-याच्या नसानसात भिनलं आहे. कारण शेतकरी हा उत्पादक आहे आणि कौशल्य हा उत्पादकाचा स्थायीभाव असतो.
मग प्रश्न हा की घोडं नेमकं अडते कुठे?
कुठल्याही व्यवसायाचे मुख्यत्वे दोन भाग असतात. उत्पादन आणि विपणन.
शेतीव्यवसायामध्ये उत्पादन घेण्यात स्वतः शेतकरीच पारंगत आहे. निसर्गावर मात करायची की त्याच्याशी मैत्री करुन समरस व्हायचं हे जेवढं शेतक-याला कळतं, तेवढं कुणालाचं कळतं नाही. कृषि विद्यापिठात पीएचडी मिळविणा-या व दररोज वृत्तपत्रात अथवा नियतकालीकात शेतिसल्ल्याचे सदर लिहिंणार्‍या कृषितज्ज्ञाच्या घरच्या शेतीपेक्षा गांवातील इतर शेतकर्‍यांची शेती नेहमीच चांगली राहात आली आहे.
शेतीव्यवसायामध्ये अडचणीची बाब म्हणजे विपणन (Marketing) .
सर्व जगात, सर्व क्षेत्रात, सर्व उद्योग-व्यवसायात Marketing ला अनन्यसाधारन महत्व आहे.उद्योगाचे यश production वर नव्हे तर Marketing वर अवलंबुन असते हा सर्वमान्य सिद्धांत असतांना शेतीतील गरिबीचे कारण Marketing सोडुन production मध्ये का शोधले जाते हा माझा मुख्य प्रश्न आहे.
शेतीविषयक धोरणे फ़सण्याची कारणे येथेच दडली आहेत.

                                                गंगाधर मुटे

स्टार माझा TV-बक्षिस वितरण

स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.

मराठी कॉर्नर

Marathi

काव्यवाचन

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

Connect With Us

E-Mail : ramewa@gmail.com Postal Address : Gangadhar Mute "kochura" At&Post - Arvi Chhoti Tal-Hinganghat Dist-wardha (m.s)

काव्यवाचन

छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं