कायद्यावरचा जनतेचा विश्वास उडाला हे खरे.
कायद्याने न्याय मिळतो यावर विश्वास जनतेचा राहिला नाही हेही खरे.
कायद्याने एकतर न्याय मिळत नाही, मिळालाच तर फार विलंब होतो हे त्यापेक्षाही खरे.
पण याचा अर्थ कायदा हातात घेऊन स्वतः दुसऱ्याला आरोपी समजून शिक्षा घेणे कदापीही, कोणत्याही व्यवस्थेत समर्थनीय ठरू शकत नाही. कायद्याचं काम कायद्यानेच केलं पाहिजे.
जनतेचा आक्रोश समजून घेता येतो पण हा आक्रोश कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी व्यक्त व्हायला हवा. हा आक्रोश कायद्याचे राज्य स्थापन करण्याऐवजी माणसांनीच हातात शस्त्र घेऊन न्याय द्यावा, अशा तऱ्हेने व्यक्त होत असेल तर त्याला आक्रोश म्हणणे अत्यंत अवघड आहे.
न्याय आणि अन्याय या भावनिक गोष्टी नाहीत इतकी तरी समज सुजाण समाजामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे.
सबब एन्काऊंटरचे समर्थन करणे म्हणजे झुंडशाहीचे समर्थन करणे होय.
- गंगाधर मुटे आर्वीकर
कायद्याने न्याय मिळतो यावर विश्वास जनतेचा राहिला नाही हेही खरे.
कायद्याने एकतर न्याय मिळत नाही, मिळालाच तर फार विलंब होतो हे त्यापेक्षाही खरे.
पण याचा अर्थ कायदा हातात घेऊन स्वतः दुसऱ्याला आरोपी समजून शिक्षा घेणे कदापीही, कोणत्याही व्यवस्थेत समर्थनीय ठरू शकत नाही. कायद्याचं काम कायद्यानेच केलं पाहिजे.
जनतेचा आक्रोश समजून घेता येतो पण हा आक्रोश कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी व्यक्त व्हायला हवा. हा आक्रोश कायद्याचे राज्य स्थापन करण्याऐवजी माणसांनीच हातात शस्त्र घेऊन न्याय द्यावा, अशा तऱ्हेने व्यक्त होत असेल तर त्याला आक्रोश म्हणणे अत्यंत अवघड आहे.
न्याय आणि अन्याय या भावनिक गोष्टी नाहीत इतकी तरी समज सुजाण समाजामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे.
सबब एन्काऊंटरचे समर्थन करणे म्हणजे झुंडशाहीचे समर्थन करणे होय.
- गंगाधर मुटे आर्वीकर
0 प्रतिसाद:
Post a Comment
माझे विचार
आपणास आवडले तरी
आणि नाही आवडले तरीही
प्रतिक्रिया अवश्य द्या...
आपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.